एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?



सन - २०१९ मध्ये एका निरीक्षणानुसार भारतीय लोकांनी मोबाईल चा वापर हा सरासरी  दिवसाला चार  तास केला , सन - २०२० मध्ये मोबाईल चा वापर हा आणखी एक तास वाढणार आहे , म्हणजे तो दिवसाला पाच तास होणार आहे .
स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या गेल्या काही  वर्षात आपल्या देशात प्रचंड  प्रमाणात वाढली आहे .

त्यात मोबाईल मध्ये अनेक नवनवे अँप्लिकेशन ही वाढत आहेत . मोबाईल मध्ये जुनेच पण आपला जास्त वेळ खर्च करायला लावणारी अँप्लिकेशन म्हणजे फेसबुक , व्हाट्सअप्प ही दोन अँप्लिकेशन . पण अलीकडच्या काळात टिक टॉक या अँप्लिकेशन मुळे ही अनेकांचा वेळ खर्च होत आहे . 
सोबतीला यु ट्यूब सारखे अँप्लिकेशन ही आहेच .
आणि यांच्या वापरामुळे पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे . 
त्यामुळे पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे .

दिवसभर जर आपण तीनशे मिनिटे म्हणजे पाच तास फोन वर असू तर आपण यातला एक तास कमी करायला हवा . 
आणि त्या एका तासात आपण वाचन केले तर आठवड्यात किमान सात तासांचे वाचन होऊन जाते .

सरासरी साठ पाने आपण दिवसाला वाचले तर आठवड्याला दोनशे पानांचे दोन पुस्तकं सहज वाचून होतील . 
म्हणजे वर्षाला १०४ पुस्तकं हे सहज वाचुन होऊ शकतात .
आणि तुम्ही जर वर्षाला शंभर पुस्तकं वाचली तर तुमच्या मध्ये आमूलाग्र बदल होईल . 

तुम्ही हा प्रयोग पुढचे तीन किंवा पाच वर्ष केला तर तुमचे तीनशे तर पाचशे पुस्तकं सहज वाचून होऊ शकतात . 
आणि एवढी पुस्तकं वाचल्या नंतर तुमच्या मध्ये किती प्रमाणात बदल होऊ शकतो याचा अंदाज तुम्ही हा ब्लॉग वाचत असतानाच लावू शकता . 

इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या मोबाईल च्या वापराला विरोध नाहीये , फक्त तुम्ही दिवसभर किती वेळ सोशल मीडियावर असता किंवा टिक टॉक वर असता हे महत्त्वाचे आहे . आणि या मुळे तुमचा किती वेळ वाया जातो हे इथे लक्षात घ्या .
तुम्हाला मोबाईल वर काही पाहायचे असेल तर तुम्ही किंडल ला पुस्तक वाचा किंवा ऑडिओ बुक ऐका .
जो वेळ सोशल मीडियावर जातोय तो कमी करून आणि तो ही एक तास कमी करून तुम्ही आठवड्याला दोन व वर्षाला शंभर पुस्तकं सहज वाचू शकता .

सुरुवातीला पुस्तक वाचनाचा वेग कमी असेल पण साधारण सहा महिन्यानंतर तो तिपटीने किंवा चौपट वाढलेला असेल .
हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे .
मागच्या वर्षी म्हणजे सन -२०१९ मध्ये मी शंभर हुन अधिक पुस्तकं वाचली . 
आणि त्याचे प्रमुख कारण मोबाईल चा वापर फक्त एक तासाने कमी केला हे होते . 

लॉकडाऊन च्या काळात आपल्या पैकी बरेच जण घरी आहेत , त्यामुळे व्यवस्थित नियोजन केले तर आपण सहज दोन तास काढू शकतो .
म्हणून आपण या काळात पुस्तक वाचन करावे . घरात पुस्तकं असतील तर ती बाहेर काढावीत . शेजारी - पाजारी कुणाकडे पुस्तकं मिळत असतील तर लॉकडाऊन चे पुर्णतः पालन करून त्यांच्या कडून पुस्तकं घ्यावीत .
नाहीतर किंडल वर ती वाचावीत .
मग कधीपासून ह्या  प्रयोगाला सूरवात करताय .

या वर्षात तुम्हाला शंभर पुस्तकं वाचनासाठी शुभेच्छा . 
#bookksintro

Comments

Post a Comment

धन्यवाद

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?